जिल्हा परिषद जळगाव

जि.प. जळगाव पदभरती २०२३

नवीनतम घोषणा

null

कार्यरत/सेवानिवृत्त जि. प. कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबींच्या तक्रारीबाबत माहिती

जिल्हा परिषद , जळगाव यांनी 100 दिवसांचा कार्यक्रम या संकल्पने अंतर्गत कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य, नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता ई. अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.  त्या संदर्भात कार्यरत/सेवानिवृत्त जि. प. कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबींच्या तक्रारीबाबत ऑनलाईन माहिती घेऊन त्या विषयी तत्काळ निर्णय घेतला जाण्यासाठी हि सेवा सुरु करण्यात आली आहे.
या अंतर्गत संबधित कार्यरत अथवा सेवानिवृत्त जि. प. कर्मचाऱ्यांना सोबत दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून अथवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या सेवा विषयक बाबींच्या तक्रारीबाबत माहिती ऑनलाईन भरता येईल. जेणेकरून ती मुख्यालय स्तरावर त्वरित प्राप्त होऊन तिचे निराकरण करणे कर्मचारी व प्रशासन या दोघांना शक्य व सोयीचे होईल.

कार्यरत/सेवानिवृत्त जि. प. कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबींच्या तक्रारी नोंदणीसाठी येथे क्लिक करा किंवा क्यूआर कोड स्कॅन करा

जिल्हा-विषयी

जळगाव हा भारताच्या महाराष्ट्रातील उत्तर भागातील जिल्हा आहे. प्रशासकीय आसन हे जळगाव शहर आहे. त्याची उत्तरेला मध्य प्रदेश राज्याने आणि पूर्वेला बुलढाणा जिल्ह्यांनी, आग्नेयेस जालना, दक्षिणेस औरंगाबाद, नै ऋत्येस नाशिक आणि पश्चिमेस धुळे या जिल्ह्यांची सीमा आहे. जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात. 
सातपुडा पर्वतरांगांनी घेरलेला जळगांव जिल्हा! तापी नदीने वेढलेला जळगांव जिल्हा! शिक्षणाचा देखील माहित नसतांना ग्रामीण धाटणीच्या कवितांनी जगभर प्रसिध्द झालेल्या बहिणाबाई चौधरींचा जळगांव जिल्हा! बालकवी ठोंबरेंचा जळगांव जिल्हा! जळगांव जिल्हा बहिणाबाई चैधरींमुळे देखील प्रकाशझोतात आला,त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या मुलाने बहिणाबाई चैधरींच्या अहिराणी भाषेतील कविता प्रकाशीत केल्या आणि अवघेजन अवाक् झाले.

जिल्हा परिषदेविषयी

आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने (१९५८) ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केलेली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने दि. ०१ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राज ची स्थापना केली. अशा प्रकारे पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील नववे राज्य बनले.  जिल्हा परिषद हि भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक सरकारी संस्था आहे. साधारणपणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हे जिल्हा मुख्यालय येथे असते.

जिल्हा परिषद मान्यवर

चालू घडामोडी व सूचना फलक

अर्जाचे नमुने व चेक लिस्ट

ई-प्रशासन

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.